आमदार संभाजी पाटील यांची माहिती

लातूर : मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळवण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होईल, अशी ग्वाही पक्षाचे नेते, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एका निवेदनाद्वारे दिली.

मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असेही आमदार निलंगेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.