राज्याच्या बहुतांश भागात तापमानात वाढ झाली असून विदर्भात चंद्रपूर, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी येथे पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. त्या भागाला उष्णतेच्या तीव्र लाटेने हैराण केले आहे. मराठवाडय़ातही पारा बेचाळिसीपार गेला आहे. आणखी दोन दिवस उकाडा असाच राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
काही शहरांत शनिवारी नोंदलेले तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : नगर ४१.५, सोलापूर ४३.४, मालेगाव ४१.९, जळगाव ४३.५, उस्मानाबाद ४२.३, औरंगाबाद ४०.९, परभणी ४३.४, नांदेड ४३, बीड ४२.८, अलिबाग ३२.६, रत्नागिरी ३३.४, भीरा ४०.५.