शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असले तरी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाहीत. राज्यातील सत्तेवरून भाजप आणि शिवसेना या दोन्ही मोठ्या पक्षांमध्ये आलेला कडवटपणा सर्वपरिचित आहे. मात्र, दोन्ही पक्षांतील कडवटपणा विसरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांन १९ जून १९८९ साली शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. त्यानिमित्त शुभेच्छा देणारे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.  शिवसेना स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा! शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले मार्गदर्शन हे नेहमीच मोलाचे ठरले आहे. आज त्यांची आठवण प्रकर्षाने होते आहे, असे मुख्यमंत्र्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.