"वडिलांच्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला संपत्ती मिळेल पण आदर हा तुम्हाला स्वत:ला कमवावा लागेल", असा टोला अभिनेत्री कंगना रणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे कंगना आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना बुधवारी पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. या कारवाईनंतर गुरुवारी कंगनाने काही ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. "तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, पण आदर तुम्हाला कमवावा लागेल. तुम्ही माझं तोंड बंद कराल, पण माझा आवाज माझ्यानंतर शंभर आणि लाखोंमध्ये प्रतिध्वनित होईल. तुम्ही किती लोकांचे तोंड बंद कराल? किती लोकांचा आवाज दाबणार? सत्यापासून कधीपर्यंत पळणार? तुम्ही घराणेशाहीच्या एका नमुन्याशिवाय काहीच नाही," अशा शब्दांत कंगनाने उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याचसोबत अनेक मराठी मित्रमैत्रिणींचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचं कंगनाने सांगितलं. तुम्हारे पिताजी के अच्छे कर्म तुम्हें दौलत तो दे सकते हैं मगर सम्मान तुम्हें खुद कमाना पड़ता है, मेरा मुँह बंद करोगे मगर मेरी आवाज़ मेरे बाद सौ फिर लाखों में गूंजेगी, कितने मुँह बंद करोगे? कितनी आवाज़ें दबाओगे? कब तक सच्चाई से भागोगे तुम कुछ नहीं हों सिर्फ़ वंशवाद का एक नमूना हो। — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 10, 2020 "मी हे स्पष्टपणे सांगू इच्छिते की महाराष्ट्रातील लोक सरकारने केलेल्या गुंडगिरीचा निषेध करत आहेत. मला माझ्या मराठी हितचिंतकांकडून अनेक फोनकॉल्स येत आहेत. मला इथे अजिबात प्रेम आणि आदर मिळत नाहीये, असा विचार जगातल्या किंवा हिमाचल प्रदेशमधल्या लोकांनी करू नका. माझे मराठी मित्रमैत्रिणी काल फोनवर बोलताना भावूक झाले. अनेकांनी माझी मदत करण्यासाठी संपर्क केला, काहींनी माझ्या घरी जेवण पाठवलं होतं. पण सुरक्षेच्या नियमांमुळे मी ते स्वीकारू शकले नाही. महाराष्ट्र सरकारच्या या कृत्यामुळे जगातल्या मराठी संस्कृती आणि अभिमानाला धक्का पोहोचू नये. जय महाराष्ट्र," असं तिने ट्विट केलं. मैं इस बात को विशेष रूप से शपष्ट करना चाहती हूँ की महाराष्ट्रा के लोग सरकार द्वारा की गयी गुंडागर्दी की निंदा करते हैं, मेरे मराठी शुभचिंतकों के बहुत फ़ोन आ रहे हैं, दुनिया या हिमाचल में लोगों के दिल में जो दुःख हुआ है वो यह कतई ना सोचों की मुझे यहाँ प्रेम और सम्मान नहीं मिलता। — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 10, 2020 मेरे कई मराठी दोस्त कल फ़ोन पे रोए,कितनों ने मुझे सहायता हेतु कई सम्पर्क दिए, कुछ घर पे खाना भेज रहे थे जो मैं सिक्यरिटी प्रोटोकॉल्ज़ के चलते स्वीकार नहीं कर पायी,महाराष्ट्र सरकार की इस काली करतूत से दुनिया में मराठी संस्कृति और गौरव को ठेस नहीं पहुँचानी चाहिए. जय महाराष्ट्रा — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 10, 2020 काय आहे प्रकरण? कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला. कंगनाच्या घरात १४ अनधिकृत बांधकामे केल्याचे पालिकेच्या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. काही ठिकाणी अनधिकृतपणे खोल्या उभारण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले होते. मात्र मुंबई महापालिकेने कालपर्यंत कोणतीही नोटीस पाठवली नाही. नूतनीकरणासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, कंगना बाहेरगावी गेली असताना तिच्या घरात असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई केलीच अशी, अशी विचारणा करत पालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली, तर कंगनाच्या घरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने केलेली कारवाई नियमानुसार आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.