रायगड जिल्ह्यातील रोहे या ठिकाणी असलेल्या कुंडलिका नदी तुडुंब भरुन वाहू लागली आहे. नागरिकांना प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारपासूनच रोह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळए कुंडलिका नदीने रौद्ररुप धारण केले आहे. रोहा अष्टमी पुलावरून पाणी वाहू लागले आहे. रोहा नागोठणे मार्गावरची रहदारी बंद करण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने पोलीस तैनात करण्यात आले आहे. रोहा अष्टमी पुलावरून पाणी वाहत असल्याने सुरक्षेचा कारणास्तव या मार्गावरची रहदारी बंद करण्यात आली आहे. रोह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. रोहा ते मुंबई, पुणे, अलिबागकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.