राज्यात पावसाचे दमदार कमबॅक झाले आहे. औरंगाबाद, लातूर, पुण्यासह कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तर, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यापासून मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या काही भागांत संततधार सुरू आहे.
कोकणपट्ट्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर, पुण्यातही दमदार पाऊस सुरू आहे. औरंगाबादवरही वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असून शुक्रवार सकाळी येथे पावसाने दमदार हजेरी लावली.