रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रासळ गावात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. रानभाज्यांच्याऐवजी विषारी पाला खाल्ल्याने या तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दोन दिवसांच्या अंतराने आई, वडील आणि मुलगा यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रासळ गावातील तारामती खाडे, राजाराम खाडे आणि अनिल खाडे या तिघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी रानभाज्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रानभाज्याऐवजी विषारी पाला खाल्ल्याने या तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी रायगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.