प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राजपथावर आयोजित संचलनासाठी येथील ४८ महाराष्ट्र बटालियनच्या दोघांसह तिघांची निवड झाली आहे. राज्यातून केवळ आठ छात्रसैनिकांची या संचलनासाठी निवड करण्यात येते.
चितळे विद्यालयातील छात्रसेना अधिकारी आर. पी. सूर्यवंशी, न्यू सिटी हायस्कूलचा छात्रसैनिक परेश माळी, छत्रपती शिवाजी हायस्कूलचा हंसराज पाटील या तिघांची संचलनासाठी निवड झाली आहे. या तिघांना बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल टी. एन. सिन्हा, कर्नल डढानिया, सुभेदार मेजर शक्तीसिंह यांचे मार्गदर्शन लाभले आहे. न्यू सिटी हायस्कूलचे छात्रसेना अधिकारी एन. व्ही. नागरे, शिवाजी हायस्कूलचे ए. टी. गोरे यांनीही छात्रसैनिकांच्या निवडीसाठी परिश्रम घेतले.