इगतपुरीजवळ सोमवारी सकाळी रुळावरून घसरलेल्या मालगाडीचे डबे हटविण्यास यश आले आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईला रेल्वे वाहतूक अखेर सुरळीत सुरू झाली आहे.   सोमवारी सकाळी ७:३० वाजता मुंबईहून भुसावळला जाणारी मालगाडी इगतपूरी जवळ रुळावरून घसरल्यामुळे नाशिककडे जाणारी संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नाशिककडे जाणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती मिळताच इगतपूरीहून मदतीसाठी रेल्वेचे पथक रवाना झाले होते. अखेर या पथकाला घसरलेले डबे हटविण्यास यश आले आहे.