-मंदार लोहोकरे

पंढरपूर येथील प्रसिद्ध भागवताचार्य वासुदेव नारायण उर्फ वा.ना उत्पात यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ८० वर्षाचे होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सावरकर प्रेमी, कट्टर हिंदुत्ववादी, पत्रकार, माजी नगराध्यक्ष, निवृत्त शिक्षक असं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Agnel School, 17 Year Old Student, Drowns in Navi Mumbai, Swimming Pool, 17 Year Old Student Drowns, Agnel School Student Drowns, Student Drowns Swimming Pool, vashi Agnel School, marathi news,
नवी मुंबई : शाळेतील विद्यार्थ्यांचा तरण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
Over 100 Private Hospitals in Pune Operate Without Renewed Licenses
धक्कादायक! पुण्यात शंभरहून अधिक रुग्णालये विनापरवाना

वा.ना. उत्पात हे हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून प्रसिध्द होते.त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला, तसेच सावरकर साहित्याचा प्रसारही केला. सावरकरांच्या विचाराचे साहित्य संमेलन सुरु करण्याची संकल्पना त्यांचीच होती.त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भुषविले होते. वा.ना उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व आध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नाव असून त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भुषविले होते. शिवाय ते येथील प्रसिध्द शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी आयुष्यभर अध्यापनाचे कार्य केले. कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते.

उत्पात यांनी सुरूवातीला येथील गजानन महाराज मठ येथे २१ वर्षे ज्ञानेश्वरी. तसेच रुक्मिणी मंदिरात भागवत कथा, रुक्मिणी स्वयंवर प्रवचन केले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली व भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून भव्य वास्तू व क्रांती मंदिराची उभारणी केली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय देखील केली होती.

वा.ना.उत्पात हे पंढरपूर अर्बन बँकेचे प्रदीर्घकाळ संचालक देखील होते. तसेच त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. उत्पात समाजाचे ते चेअरमन होते. आणीबाणीमध्ये दीड वर्षे ते तुरुंगवासात होते. तसेच साप्तहिक प्रहारचे ते संपादक होते. त्यांनी विविध विषयावर तब्बल १८ पुस्तके लिहिली आहेत. देवर्षी नारद पुरस्कार, आदर्श शिक्षक, नानासाहेब पेशवे, लावणीचा रामजोशी अशआ अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेले आहे. असे बहुआयामी नेतृत्व आता काळाच्या पडद्याआड गेले आहे.

दरम्यान,करोनाने पंढरपूरचे मोठे नुकसान केले असून यापूर्वी माजी आमदार सुधाकपंत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील, ह.भ.प. रामदास महाराज जाधव (कैकाडी), भाजपाचे शहराध्यक्ष संजय वार्इकर यांचे देखील या आजाराने निधन झाले आहे.