औरंगाबादमध्ये शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना भरधाव वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. भागीनाथ लिंबाजी गवळी (वय ५६), नारायण गंगाराम वाघमारे (वय ६५),दगडुजी बालाजी ढवळे (वय ६५), अनिल विठ्ठलराव सोनवणे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण औरंगाबादमधील चिकलठाना परिसरातील हनुमान चौक येथील रहिवाशी होते. या अपघातानंतर वाहनचालक गाडी घटनास्थळी सोडून फरार झाला. सर्व मृतदेह श्वविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.