यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महमार्गावर वारकऱ्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे. ठार झालेेल व्यक्ती हीदेखील वारकरी आहे. आत्माराम मुंढे असं या मयत वारकऱ्याचं नाव आहे. ते ६० वर्षांचे होते

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,एम एच-47 क्यू-6260 या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात झाला यात असलेल्या चार वारकऱ्यांन पैकी एक वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत.त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वारकऱ्यांची गाडी मुंबईहून पंढरपूरकडे जात होती. या प्रवासादरम्यान गाडीच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कड्याला ही गाडी धडकली असल्याचं समजतं. या संरक्षक कठड्याला गाडीची जोरदार धडक बसल्याने ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून देहुरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आषाढी कार्तिकीला वारीसाठी पंढरपूरमध्ये लाखो भक्तांचा, वारकऱ्यांचा मेळा जमतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारीसाठी लाखो वारकरी यावेळी पायपीट करत येतात. त्याचप्रमाणे एवढी पायपीट शक्य नसलेले इतरही वारकरी गाड्यांमधून येतात. अशाच प्रकारे मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या या गाडीला अपघात झाल्याने त्यात बसून पंढरीच्या वारीला निघालेल्या एका वयस्कर वारकऱ्यांचा दु:खद मृत्यू झाला आहे. या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.