पतीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. गेवराई तालुक्यातील चकलंबा येथे ही घटना घडली आहे. एक वर्षांपुर्वी दांपत्याचं लग्न झालं होतं. पती-पत्नीने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पत्नीने पतीच्या विरहामुळे आत्महत्या केली की अन्य काही कारण होतं याची पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रणजित जाधव आणि मिनाक्षी जाधव यांचं एक वर्षापूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही औरंगाबादमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते. तिथेच रणजीत जाधव याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह गावी चकलंबा येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

घरात शोककळा पसरली असतानाचा मिनाक्षीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे घराच एकच गोंधळ उडाला. पतीनंतर पत्नीनेही आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलीस दोघांच्याही आत्महत्येचं नेमकं कारण काय याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.