पतीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. गेवराई तालुक्यातील चकलंबा येथे ही घटना घडली आहे. एक वर्षांपुर्वी दांपत्याचं लग्न झालं होतं. पती-पत्नीने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पत्नीने पतीच्या विरहामुळे आत्महत्या केली की अन्य काही कारण होतं याची पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रणजित जाधव आणि मिनाक्षी जाधव यांचं एक वर्षापूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही औरंगाबादमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते. तिथेच रणजीत जाधव याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह गावी चकलंबा येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात शोककळा पसरली असतानाचा मिनाक्षीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे घराच एकच गोंधळ उडाला. पतीनंतर पत्नीनेही आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलीस दोघांच्याही आत्महत्येचं नेमकं कारण काय याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.