राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेनं 'एनडीए'तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, केंद्रात मंत्री असलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली असून, काँग्रेस चार वाजता आपला निर्णय घेणार आहे. तर काँग्रेसनं निर्णय घेतल्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.