पाच वर्षात महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. आघाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? आघाडीने तर आदर्श घोटाळा करुन लष्करातल्या जवानांच्या घराबाबतही घोटाळा केला असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी केला.

मुंबईला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं. या शहरात घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणी काहीही प्रयत्न केले नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने यांचा विचार केला नाही. भाजपानेच प्रत्येकाचं घर मुंबईत असावं हा विचार केला. मुंबईत मेट्रोचं जाळं आम्ही येत्या काळात उभारणार आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

विरोधकांनी मुंबईत १६ वर्षात फक्त ११ किमीची मेट्रो उभारली. ही गती तर कासवापेक्षाही कमी आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ आहेत असा उल्लेख पुन्हा एकदा केला.