लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने बुधवारी (१३ मार्च) मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ महत्त्वाचे निर्णय घेतले. यात अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य केलं जाईल, पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ, महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता देण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्यात २३ हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा संकल्प केला आहे. यापैकी दहा हजार किमीपर्यंतचे रस्ते यंदाच्या वर्षात बांधले जातील, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

मंत्रिमंडळ बैठकीतले २८ महत्त्वाचे निर्णय

  • मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर
  • पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार
  • अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास मान्यता
  • केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता
  • जम्मू काश्मीरच्या श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार
  • कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प
  • भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज
  • राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ
  • महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार, नफ्यात आणणार
  • मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार
  • मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार
  • शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.
  • मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढवले.
  • आयटीआयमधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.
  • कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
  • शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार, ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता
  • पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार
  • पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता
  • म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन
  • आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ
  • मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार
  • मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार.
  • उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते
  • भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार
  • महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन
  • जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता
  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना