कराड : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ खाजगी आराम बसला काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत ही आराम बस जळून खाक झाली तर लाखो रुपयांचे नुकसान होताना दुसरीकडे मात्र सुदैवाने आराम बसमधील सर्व ५५ प्रवासी बचावले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की डॉल्फिन कंपनीची आराम बस (क्रमांक एमएच ०३, पी.सी. ४५००) ही सुमारे ५५ प्रवाश्यांना घेवून मिरजेहून मुंबईकडे निघालेली असताना (तासवडे ता. कराड) गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. त्यात या बसला पाठीमागून आग लागली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.

Brutal killing of a surrendered Naxalist by firing bullets
गडचिरोली : धक्कादायक! आत्मसमर्पित नक्षल्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या
Can lemon Juice Reduce Motion Sickness
गाडीच्या प्रवासात मळमळ, उलटी होत असेल तर लिंबू जवळ ठेवाच! डॉक्टरांनी सांगितले फायदे, लिंबू खाऊ नका उलट असा वापरा
Loksatta lokrang book raabun nirmiti karnarya poladi baya Stories of eight women of the Ghisadi community
घिसाडी जीवनाचं वास्तव
rajasthan bhilwara murder case
विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय, तरुणाचे अपहरण करून हत्या अन् मृतदेह…; अंगावर शहारे आणणारी घटना समोर!
Healthy Midnight Snacks Option
रात्री तूप लावलेला ‘हा’ पराठा खाल्ल्याने पचनही होईल वेगवान; तीन वस्तू वापरून करायची रेसिपी व फायदे जाणून घ्या
Pre sowing tillage, Modernizing Agriculture methods in pre sowing tillage, Traditional Methods in Pre sowing tillage, Sustainable Practices in pre sowing tillage, agriculture, marathi article
पेरणीपूर्व मशागत : काही प्रश्न आणि काही भूमिका
congress leader rahul gandhi speech in lok sabha
पहिली बाजू : असत्याची फॅक्टरी बंद पडेल!
Dombivli, traveler, robbed, Taloja-Khoni road,
डोंबिवली : तळोजा-खोणी रस्त्यावर प्रवाश्याला पोलीस सांगून दिवसाढवळ्या लुटले

बसला आग लागल्याचे पाहून महामार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनातील लोकांनी ही माहिती तासवडे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना दिली. लगेचच टोलनाका व्यवस्थापनाने मदतीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. महामार्ग व्यवस्थापनाचे गस्त घालणारे पथक, तळबीड पोलीस हेही दाखल झाले. सर्व प्रवाश्यांना सुखरूप बसमधून बाहेर काढण्यात आले होते. प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.

दरम्यान, नजीकच्या आग्निशामक दलाशी संपर्क झाल्याने पाणी बंब व आग्निशामक पथकही दाखल झाले. त्यांनी ही आग बसच्या डिझेल टाकीपर्यंत पोहचू दिली नाही. त्यामुळे या टाकीचा स्फोट झाला नाही आणि सुदैवाने आणखी हानी टळली. वाहनाचे लाखोंचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु, प्रवाशांचे काय आणि रक्कमेचे नुकसान झाले हे पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे.