नितीन आगे खून प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका झाली आहे. २०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे याची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने मुख्य आरोपी सचिन गोलेकर याच्यासह ९ आरोपींची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे २८ एप्रिल २०१४ रोजी नितीन आगेची हत्या करण्यात आली होती. गावातील वरच्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून नितीनची संपूर्ण गावासमक्ष निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाकडे सुरुवातीला पोलिसांनी डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीनच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नितीन आगे हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते.

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Chandrapur, Sudhir Mungantiwar, Pratibha Dhanorkar,
चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…
mahayuti searching non controversial new face for nashik lok sabha seat
महायुतीतर्फे नव्या चेहऱ्याचा शोध; नाशिकमध्ये वाद टाळण्याचा प्रयत्न; जागा कोणत्या पक्षाला जाणार हे अस्पष्टच
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

याप्रकरणी नितीनचे वडील राजू आगे यांनी गावातील सचिन गोलेकर आणि शेषराव येवले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मुलीचा भाऊ आणि तीन अल्पवयीन मुलांसह ९ जणांना अटक केली होती. या सर्वांवर हत्या आणि अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र सबळ पुराव्याअभावी जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.