महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला. येथील जनता ७ मे रोजी धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी घोडे फरार करेल”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विश्वनेते आहेत. नरेंद्र मोदी यांचा कुणीही नाद करायचा नाही. आपलं ठरलं आहे, मत मोदींना आणि मत धनुष्यबाणाला. पंतप्रधान मोदी यांना मत म्हणजे देशाच्या निकासाला मत. विकासाबरोबर ते देशाचा वारसाही जपत आहेत. त्यामुळे आपण कायम म्हणतो, मोदी है तो सब मुमकिन है. या देशात गॅरंटी कुणाची चालते? बाकीच्या गॅरंटी फेल झाल्या आहेत. फक्त एकच गॅरंटी चालते, ती म्हणजे मोदींची गॅरंटी. या देशाला जगामध्ये सन्मान मिळून देण्याची गॅरंटी. शेतकऱ्यांना सक्षम करण्याची गॅंरटी. या गॅरंटीच्या आडवे येणाऱ्यांचा काट किर्रर्र झाल्याशिवाय राहणार नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला.

Eknath shinde mahayuti marathi news
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या मेळाव्याकडे मित्र पक्षांची पाठ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
cost of inauguration ceremony of Metro should be taken from honorarium of cm and Deputy cm says MLA Ravindra Dhangekar
मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे : आमदार रवींद्र धंगेकर
petitioner demand in bombay hc to file case against eknath shinde and nitesh rane over anti muslim remarks
मुस्लिमविरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप, मुख्यमंत्री शिंदे आणि नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करा, याचिकेद्वारे मागणी
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
Eknath shinde appreciated mla Sanjay Gaikwad
मुख्यमंत्र्यांकडून गायकवाड यांचे कौतुक, उपमुख्यमंत्र्यांचे खडेबोल
aap leader Atishi
विश्लेषण: पहिल्यांदाच आमदार, पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद; आतिशींच्या निवडीमागे ‘आप’चे कोणते समीकरण?

हेही वाचा : ‘दोन टप्प्यानंतर एनडीए २-० ने पुढे’, कोल्हापूरच्या सभेत फूटबॉलच्या भाषेत पंतप्रधान मोदींची जोरदार फटकेबाजी

“काँग्रेसचं काय चालालंय? येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फक्त आश्वासनांचे पेढे नाही तर त्यांच्याकडे गॅरंटी आहे.आपण फक्त मत माघत नाही तर काम करतो. पूर आला तेव्हा कोल्हापूरकरांचं दर्शन घडलं. त्यावेळी पहिल्या आणि दुसऱ्या माळावर पाणी शिरलं होतं. तेव्हा लोक वरती माळावर गेले होते. त्यावेळी लोक आपल्या गायी-म्हशींनाही बरोबर घेऊन गेले होते. तेव्हा त्यांना विचारलं तर ते म्हणाले हे आमचं कुटुंब आहे, म्हणून एकीकडे गो-धनाला बरोबर ठेवणारे कुठे आणि २६ जुलैच्या पुरावेळी बाळासाहेबांना मातोश्रीमध्ये एकटे सोडून फाईव्ह स्टारमध्ये जाणारे कुठे?”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन. पण आज त्यांचा मुलगा आणि परिवार काँग्रेसला मतदान करणार आहे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. ज्या गोष्टींचा खेद वाटायला हवा, त्या गोष्टींचा त्यांना अभिमान वाटत आहे. आता उबाठाची शंभर टक्के काँग्रेस झाली आहे”, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.