“लव्ह आणि जिहाद या दोनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तलवार उचलून कुणाला तरी मारणं याला लोक जिहाद समजतात, हेही चूक आहे. भारताचे संविधान प्रत्येक पौढ नागरिकाला त्याच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचा अधिकार देतो. जर कुणी आपल्या पसंतीनुसार जोडीदार निवडून लग्न करत असेल तर त्यावर दुसऱ्यांना त्रास होण्याचे काय कारण? दुसरे असे की भाजपशासित राज्यात जिथे जिथे लव्ह जिहादचा कायदा बनला, तो असंवैधानिक आहे. भाजपाला प्रेमाचा एवढा राग का येतो? प्रत्येक गोष्टीला सांप्रदायिक रंग द्यायची गरज नाही. महाराष्ट्रात शेतकरी अडचणीत आहे, त्यावर काही बोलले जात नाही. महाराष्ट्रातील युवकांचे ज्वलंत प्रश्न आहेत, त्यावर बोलायला तयार नाहीत.”, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा मधील अनेक लोकांनी धर्माच्या बाहेर…

मध्य प्रदेशने केलेल्या कायद्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे. लव्ह जिहादच्या बाता मारणाऱ्या भाजपा पक्षातील अनेकांनी धर्माच्या बाहेर जाऊन लग्न केलेले आहे. पण आपण कोणत्या विषयावर चर्चा करत राहायची. आज देशात बेरोजगारी हाच मोठा मुद्दा आहे. महागाई सहा टक्क्याने वाढली आहे. बेरोजगारी आठ टक्क्यांवर आली आहे, जगात सर्वात जास्त बेरोजगारी आपल्याकडे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले आहेत. हे सोडून जे लग्न करतायत त्यांच्यामध्ये तुम्ही का पडतायत? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim chief asaduddin owaisi talks about love jihad blames bjp kvg
First published on: 05-01-2023 at 12:40 IST