भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार लगावला. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केलं. पंजाबने काँग्रेसचा ‘झाडू’न धुव्वा उडवला. ‘आप’ने दिल्लीपाठोपाठ तिथेही एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडदौड केली. पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या अस्तित्वावर या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केले असून पुन्हा एकदा नेतृत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

“काँग्रेस बाप आहे, बापच राहील”, नाना पटोलेंनी भाजपाला सुनावलं!

पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी फारच निराशाजनक राहिली. एकाही राज्यात काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र असं असतानाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४ च्या निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करेल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. नाना पटोले यांच्या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

“राहुल गांधी द्रष्टे नेते आहेत, २०२४ साली ते पंतप्रधान होतील,” असं नाना पटोले यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “राहुल गांधी द्रष्टे नेते असून २०२४ साली पंतप्रधान होतील यात दुमत नाही. सध्या राजकीय वातावरण पाहिले तर अनेक गोष्टी समोर येत आहेत. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. याला आता जनता कंटाळली आहे. राहुल गांधींकडे व्हिजन आहे”.

“२०१९च्या महामारीची सूचना राहुल गांधींनी आधीच दिली होती, पण त्यांची टिंगलटवाळी केली होती. या देशाला पुढच्या काळात काँग्रेसच सांभाळू शकते,” असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काँग्रेसनंच हा देश उभा केला”

दरम्यान, काँग्रेसवर टीका करणाऱ्या विरोधकांना नाना पटोले यांनी सुनावलं आहे. “आम्ही त्यांना अनेकदा उदाहरणं दिली की काँग्रेस बाप आहे, बाप राहील. त्यांनी या चिल्लर गोष्टी सोडून द्या. काँग्रेस कुणाचीही बिन बुलाए मेहमान नाही. काँग्रेसनंच हा देश उभा केला. ज्या काँग्रेसच्या भरवशावर ते मोठे झाले, त्याच काँग्रेसविषयी ते बोलत असतील, तर ही त्यांची नादानी आहे”, असं नाना पटोले म्हणाले.