‘तेव्हा आमची चूक झाली. दीपकच्या कामाला विरोध केला, पण त्याने केलेले काम आता आनंद देत आहे. तमाशा कलावंत, ऊसतोड कामगारांच्या मुलांबरोबर माझा नातूही दहावीत शिकतो आहे. आनंद वाटतो.’ अनाथ, वंचित मुलांसाठी झटणाऱ्या दीपक नागरगोजे यांच्या आई त्यांचे कौतुक करीत होत्या. बाबा आमटे यांच्या प्ररणेतून आपल्या गावातील समस्येवर मात करायची या प्रेरणेने काम सुरू करणाऱ्या नागरगोजे दाम्पत्याने बीड जिल्ह्यत सुरू केलेले ‘शांतिवन’ सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक तरुणांचे प्रेरणास्थान बनते आहे. या प्रकल्पात आता ३०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात ८० मुली प्रकल्पात निवासी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठय़ा कष्टाने हा उभा राहिला, असे दीपक नागरगोजे यांच्या पत्नी कावेरी सांगत होत्या. ‘पहिले काही दिवस वीज नव्हती. कारण प्रकल्पच शेतात होता. वेगवेगळय़ा परिस्थितीमध्ये वाढलेली मुले. कोणी तमाशा कलावंताचा मुलगा तर कोणी ऊसतोड मजुराची मुलगी. कोणी शाळेचे तोंड न पाहिलेले तर कोणी अर्धवट शाळा सोडलेली. त्यांना सांभाळताना मोठी कसरत असते. एकदा मुले झोपली का, हे पाहण्यासाठी गेले. तेव्हा साप चावला. १५ दिवस बीडच्या रुग्णालयात होते. नातेवाईकांनी ‘हे काम बंद करा’ असे बजावून सांगितले. पण, या निरागस मुलांच्या प्रार्थनेमुळेच जीव वाचल्याची भावना झाली आणि वंचित मुलांच्या शिक्षणाचे शांतिवन सुरू झाले. कधी किराणा आणायला पैसे नसायचे तर कधी मुलांसाठी कपडे. अनेक दु:खाचे प्रसंग वाटय़ाला आले, असे कावेरी सांगत होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak nagargoje kaveri nagargoje started shantivan in beed for social cause
First published on: 28-08-2017 at 03:59 IST