मी आज पाच वाजता बेमुदत उपोषणाबाबत काय ती भूमिका मांडणार आहे. तर राज्यातलं साखळी उपोषण हे शांततेत सुरु ठेवायचं आहे. आम्हाला साखळी उपोषण करण्याचा अधिकार आहे. तसंच इतरांनी जे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे ते थांबवलं आहे. मराठे मागे हटत नसतात. आपण मागे आलो कारण पोलिसांचा फौजफाटा इतका लावण्यात आला त्यातच त्याची (देवेंद्र फडणवीस) माघार दिसली. आपण यशस्वी झालो आहोत. मराठ्यांना अडचणींत आणू नका. आज आणि रात्रीही मला कुणाला अडचणींत येऊ नये म्हणून आम्ही त्यांनाच (देवेंद्र फडणवीस) हरवलं आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

मराठ्यांची नाराजी तुम्हाला परवडणार नाही

मराठ्यांची नाराजी तुम्हाला परवडणार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे सग्या-सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. लोकांचा विचार करुन मी आत्ता आंतरवलीत आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे की एखादा किल्ला जिंकायचा असेल तर सगळा विचार करुन घ्या. आता माझे मावळे, माझे मराठे किल्लाच जिंकणार आहेत असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

Sachin Tendulkar and his family at Union Minister Nitin Gadkari Nagpur residence
तेंडुलकर कुटुंबासह पोहोचला गडकरींच्या घरी…गडकरींनी दिला एकच सल्ला…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Kolhapur hasan mushrif marathi news
गुरुदक्षिणेऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हसन मुश्रीफ यांचे समरजित घाटगेंवर टीकास्त्र
woman reacted ruckus inside the office of Devendra Fadnavis
Video: लाडक्या बहिणीने कार्यालयाची नासधूस केली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणीतरी जाणीवपूर्वक…”
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
Firing in front of Guardian Minister Dr Tanaji Sawants nephews bungalow
पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या बंगल्यासमोर गोळीबार
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
Case against former Shiv Sena corporator Mohan Ugle in Kalyan
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा

जनताच मालक आहे हे विसरु नका

१६ दिवस झाले त्यांना इथे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. काल गुन्हे का दाखल करण्यात आले? एकाच्या हट्टापायी समाज अडचणींत येऊ नये. आम्ही वेळ-काळ ओळखूनच निघालं होतं. आज सरकार आहे म्हणून तु्म्ही इंटरनेट, पेट्रोल पंप बंद करता. पण लक्षात ठेवा जनताच मालक आहे असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. समाजाला सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी पुन्हा एकदा जरांगेंनी केली आहे.

सागर बंगल्यावर बोलवलं आणि दरवाजे बंद करुन घेतले

सागर बंगल्यावर स्वागत करु म्हणाले होते ते तुम्ही करायला पाहिजे होतं. त्यामुळे तुम्ही मोठे झाला असतात असाही टोला मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मला बोलवलं आणि घराचे दरवाजे बंद केले. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अविश्वास दाखवलेला नाही. मात्र त्याचं ऐकून (देवेंद्र फडणवीस) बोलत असाल तर आम्ही शांत बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल की आता हे माघारी फिरले आहेत तर आपल्याला डाव खेळता येईल. आंतरवालीचा लाठीमार पुन्हा करण्याचा प्रयत्न करु नका. गोडी गुलाबीने सांगतो आहे सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्या विरोधातली नाराजीची लाट वाढत जाणार आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस, प्रसिद्धीसाठी मराठा मुलांचा…”, आता कुणी केले गंभीर आरोप?

मनोज जरांगे माघारी फिरले

मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांनी सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं आहे. आम्हाला कायद्याचं पालन करायचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला आहे. शहाणी भूमिका घेऊन परत जातो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी भंबेरी गावातून आंतरवाली सराटीमध्ये परतले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने शांत रहावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेलं नाही. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिलं पाहिजे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.