राजा आणि प्रजेमध्ये वर्षांतून किमान एकदा तरी सुसंवाद व्हावा, यासाठी गडचिरोली जिल्हय़ातील ‘अहेरी इस्टेट’च्या राजघराण्याने दसरा उत्सव सुरू केला. दीडशे वर्षांपेक्षा मोठी परंपरा लाभलेल्या या दसरा उत्सवाला आता मात्र उतरती कळा लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशावर ब्रिटिशांचा अंमल असतानासुद्धा आपले राज्य शाबूत राखणाऱ्या अहेरीचे राजे पहिले धर्मराव आत्राम यांच्या काळात सुरू झालेला हा उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होत होता आणि आजही होत आहे. परंतु आज गर्दी ओसरली आहे. दीडशे वर्षांपूर्वी अहेरी इस्टेटचा पसारा ५५० चौरस मैल परिसरात पसरलेला होता. ५४८ गावांची जमीनदारी व त्यातल्या १८ गावांची मालगुजारी (मालकी) असे या राजवटीचे स्वरूप होते. ब्रिटिशांच्या राजवटीत हे राजघराणे आणखी बहरले. त्याचे बक्षीस म्हणून त्यांनी या घराण्याला एक मोठा राजमहाल बांधून दिला. सध्याच्या घडीला १२० वर्षांचा असलेला हा महाल जागोजागी गतवैभवाची साक्ष पटवतो. हा महाल दुरुस्त करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यानंतर सत्यवानरावांनी तात्पुरता महाल उभारण्याचा निर्णय २५ वर्षांपूर्वी घेतला. सध्या राजघराण्याचे वास्तव्य असलेला हा रुक्मिणी महाल हेच आता या राजवटीचे मुख्य केंद्र झाले आहे. जुना महाल तसाच पडून आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dussehra festival celebration in chandrapur
First published on: 30-09-2017 at 02:56 IST