“समाजाचं मनोरंजनीकरण झालं असताना आणि समाज एका दिशेला जात असताना माध्यमांनी मधे उभं राहून समाजाला दुसरी दिशा दाखवली पाहिजे,” असं मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन बोलताना व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमांचं मनोरंजनीकरण झालं म्हणजे समाजाचं मनोरंजनीकरण झालं आहे, असंही निरिक्षण मांडलं. तसेच समाजाला वैचारिकतेकडे नेण्याची जबाबदारी माध्यमांची असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पाहूयात गिरीश कुबेर यांचं संपूर्ण भाषण. लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.