सांगली : तेलंगणामधील भारत राष्ट्र समितीमध्ये गेलेल्यांच्या अपेक्षा फोल ठरल्याने घरवापसी सुरू झाली आहे. यामुळे कोण बाहेर पडला तरी राष्ट्रवादीवर परिणाम होणार नाही. नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेउन राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील रहा असा सा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. शनिवारी सांगलीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार पाटील बोलत होते.

आ. पाटील म्हणाले, काही महिन्यापुर्वी तेलंगणातील बीआरएस या पक्षाचा मोठा गाजावाजा होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा पराभव झाला. त्याठिकाणी काँग्रेसने कष्ट घेतले. त्यांना लोकांनी सत्ता दिली. बीआरएसमध्ये काही आमच्या पक्षातील लोक गेले होते. त्यांचाही आता भ्रमनिरास झाला असून ते पुन्हा आमच्याकडे येत असून त्यांची घरवापसी होत आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut : “देशात जवानांच्या हत्या होतायत, मोदींनी शपथ घेतल्यापासून…”, जम्मूतील परिस्थितीवरून संजय राऊतांची मोदी आणि शाहांवर टीका
Donald Trump get benefit of sympathy
विश्लेषण: जीवघेण्या हल्ल्यामुळे मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल का?
bombay High Court, Nitesh rane, BJP MLAs nitesh Rane, geeta Jain, Religious Sentiment Violation, bjp, police, Maharashtra government, marathi news, Maharashtra news,
नितेश राणे यांनी उच्चारलेला रोहिंग्या-बांगलादेशी शब्द भारतीयांच्या भावना दुखावणारा नाही, पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा
RSS linked magazine echoes Opposition on delimitation flags concern about regional imbalance
“…तर दक्षिणेतील राज्यांचे महत्त्व कमी होईल”; संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ने मिसळला विरोधकांच्या सुरात सूर
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
Sujata Saunik first female Chief Secretary of Maharashtra
सुजाता सौनिक ठरल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव! कसा होता त्यांचा प्रवास पाहा….
BSP Kanshi Ram Mayawati Bahujan Samaj Party risks losing national party status
एकेकाळी दलितांसाठी आशा ठरलेल्या बसपाचा ‘या’ कारणांमुळे जाणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?
Sangli, road washed away,
सांगली : आठ दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या रस्त्यासाठी २ कोटी मंजूर

आणखी वाचा-आमदार जयंत पाटलांची हुकुमशाही- भाजपा जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील

ग्रामीण भागात आजही शेतकर्‍यांचा नेता म्हणून शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.हा मतदार राष्ट्रवादीपासून दूर करण्यासाठी एका पक्षाने बीआरएसला सांगितले होते. मात्र, राष्ट्रवादीमध्येच फूट पडल्याने बीआरएसची आता गरजच उरलेली नाही अशी त्या पक्षाची मानसिकता झाली असल्याने काही तरी पदरात पडेल म्हणून गेलेल्यांचा भ्रमनिरास झाला.

जिल्ह्यातही काही मंडळी दुसर्‍या गटात गेली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. पक्षाध्यक्ष पवार यांच्या विचारावर विश्‍वास असलेली मंडळी आजही पक्षासोबत आहेत. गेलेल्यांची चिंता न करता नव्या कार्यकर्त्याना सोबत घेउन पक्षाचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.