मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही संपलेला नाही. मनोज जरांगे पाटलांचं गेल्या १६ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सरकारने मागितलेला एक महिन्याचा कालावधी मनोज जरांगेंनी दिला आहे, परंतु, तरीही त्यांनी अद्याप उपोषण सोडलेलं नाही. जालन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना त्यांच्या मुलांनी बुलाढाण्यात आंदोलन छेडलं आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची धाकटी कन्या पल्लवी जरांगे पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटायला येणार आहेत, म्हणजे ते काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊनच येतील. मराठा आता पेठून उठला आहे. आता सरकारला दखल घ्यावीच लागणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही मराठा आहोत, पेटलेलो आहोत, आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही”, असा ठाम निर्धार तिने बोलून दाखवला.

Himanta Biswa Sarma
CM Himanta Sarma : “आसामला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली?” ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ विधानवरून मुख्यमंत्री सरमा यांचा हल्लाबोल!
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Sharad Pawar, NCP, Chief Minister, Maha Vikas Aghadi, Uddhav Thackeray, Shiv Sena, Congress, Sanjay Raut,
मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांच्या भूमिकेने महाविकास आघाडीतील तिढा वाढला
MP Praniti Shinde says Opposition leader is our Chief Minister
चंद्रपूर : खासदार प्रणिती शिंदे म्हणतात, ‘विरोधी पक्ष नेता आमचा मुख्यमंत्री…’
eknath shinde and ajit pawar 4
स्वाक्षरीवरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये धुसफूस
Statement of Eknath Shinde along with Devendra Fadnavis and Ajit Pawar regarding Chief Minister Ladki Bahin Yojana print politics news
लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्वाळा
Advice from Chief Minister Eknath Shinde on opposition criticism of Chief Minister Majhi Ladki Bahin scheme print politics news
योजनेवर टीका करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना तंबी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कानउघाडणी
Another mistake in Devendra Fadnavis security
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत पुन्हा चूक; नेमकं काय घडलं?

हेही वाचा >> मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “तांत्रिक बाबी…”

गेल्या १६ दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण धरलं आहे. त्यामुळे ते उपोषण केव्हा सोडणार असा प्रश्न पल्लवीला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, “उपोषण कधी सुटेल हा त्यांचा प्रश्न आहे. उपोषण कधी सोडणार हे पप्पा सांगणार नाहीत. पण, आरक्षण मिळत नाही तोवर ते उपोषण सोडणार नाहीत हे नक्की.”

मनोज जरांगेंनी १६ दिवसांपासून उपोषण केलं आहे. त्यांची प्रकृती खालावत जात आहे. त्यामुळे वडिलांची काळजी वाटते का? असा प्रश्नही तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, “मुलगी म्हणून पप्पांची काळजी वाटते. ते माझे वडील आहेत. कोणत्या मुलीला वडिलांची काळजी नसते? माझा बाप मला परत हवाय, त्यामुळे आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्या”, अशी आर्त मागणी तिने सरकारकडे यावेळी केली.