बहुचर्चित कल्पना गिरी हत्याप्रकरणाचा तपास आता सीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी लातूर पोलिसांना हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात आल्याचे सांगितले. कल्पना गिरी या लातूरमधील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या. रंगपचमीच्या दिवशी त्यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर तुळजापूर येथील पाचुंदा तलावात कल्पना गिरींचा मृतदेह सापडला होता.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी चंद्रपूरच्या सभेत या प्रकरणाचा उल्लेख केल्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये कल्पना गिरी हत्याप्रकरण खूप गाजले होते. याप्रकरणी आतापर्यंत महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक करण्यात आली असून या दोघांनी हत्या केल्याची कबुलीसुद्धा दिली आहे. दरम्यान याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी राज्यसरकारला केली आहे.

Special court order BJP MP Pragya Singh
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित राहा, साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष न्यायालयाचे आदेश
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल