आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत झाली आहे. जेसीबी आणि कामगार घटनास्थळी रवाना झाले आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान दरड हटवण्याचं काम सुरु असून लवकरच मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटाला नेहमीच ढगफुटीचा फटका बसत असतो. अनेक ठिकाणी रस्यावर भेगा पडल्या आहेत. सार्वजनिक विभागाकडून घाटातील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अडीच कोटीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पावसाळ्यात या मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असतात.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2019 रोजी प्रकाशित
आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत
दरड हटवण्याचे काम सुरु आहे
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 06-09-2019 at 15:59 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Landslide at amba ghat ratnagiri kolhapur route affected sgy