जालन्यात तापमानाचा पारा ४३ अंशांवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढत्या उन्हामुळे जालनेकर त्रस्त आहेत. शहरातील तापमान शनिवारी आणि रविवारी ४३ अंशांवर पोहोचले होते. गेल्या दीड-दोन महिन्यांपासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून मे महिना सुरू झाल्यापासून तर ती अधिकच जाणवत आहे. सात-आठ दिवसांपूर्वी उन्हाची तीव्रता किंचितशी कमी झाली होती. परंतु सध्या मात्र सकाळी ११ ते सायंकाळी पाच दरम्यान घराबाहेर पडू नये, अशी अवस्था आहे. अशा स्थितीत नेते मंडळींना वातानुकूलित वाहनातून बाहेर येऊन ४३ अंशांच्या तापमानात लग्नसमारंभाला हजेरी लावावी लागत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders attending wedding in intense heat
First published on: 08-05-2017 at 01:05 IST