रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये समुद्रात खेळण्याचा आनंद घेणाऱ्या दाम्पत्याला समुद्रात खेळणे चांगलेच अंगाशी आले. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेले. मात्र येण्यासाठी वेळ झाला आणि समुद्राला भरती आली. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून आलेले हे दाम्पत्य या अजस्त्र लाटांमध्ये अडकले. मात्र स्थानिकांच्या मदतीने या दोघांना वाचविण्यात यश आले.

आणखी वाचा-Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाट्ये समुद्रात अडकलेल्या या दाम्पत्याने शहर पोलिसांकडे संपर्क साधला. मात्र अजस्त्र लाटांमध्ये या दाम्पत्याला वाचवण्यात अडचणी येत होत्या. याचवेळी येथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये यांनी जीवाची पर्वा न करता अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाम्पत्याला वाचविले. जीवाची सुटका होताच दोघा दाम्पत्याने दोघा तरुणांचे अक्षरशः पाय धरत आभार मानले.