रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बुधवारी दिवसभर वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे महावितरणचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ातील सुमारे २ लाख २९ हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित झाला.
रत्नागिरी जिल्ह्य़ात चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा इत्यादी तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जास्त फटका बसला. जिल्ह्य़ातील महावितरणचे लघुदाबाचे २१५ व उच्चदाबाचे ३८ खांब या वादळामुळे मोडले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील उच्चदाबाचे ४३ व लघुदाबाच्या ७८ खांबांचे नुकसान झाले. चिपळूण व गुहागर तालुक्यात हे नुकसान सर्वाधिक आहे. चिपळूण शहर व तालुक्यात मिळून १२० लघुदाबाचे व २१ उच्चदाबाचे तर गुहागर तालुक्यात लघुदाबाचे २० खांब उद्ध्वस्त झाले.
वादळाच्या या रौद्र स्वरूपामुळे जिल्ह्य़ातील सुमारे २ लाख २९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. कारण एकूण ७९ फिडरमार्फत होणाऱ्या वीजपुरवठय़ावर परिणाम झाला होता. त्यापैकी ७५ टक्के पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. महावितरणचे कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता सिद्धार्थ नागटिळक आणि रत्नागिरी विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे दुरुस्तीच्या कामावर व वीजपुरवठा पूर्ववत करण्यावर देखरेख ठेवत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2014 रोजी प्रकाशित
वादळी पावसामुळे महावितरणचे एक कोटी रुपयांचे नुकसान
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बुधवारी दिवसभर वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे महावितरणचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
First published on: 09-05-2014 at 12:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran one crore loss by windy rain