मुंबई – गोवा महामार्गावर लांजा तालुक्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिल व सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. तर सात जण या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई – गोवा महामार्गावर वाकेडघाटीजवळ भरधाव कारने ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारमधील प्रवासी हे मुंबईहून राजापूरला जात होते. राजापूर ५० किलोमीटर अंतरावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील मृत प्रवासी हे राजापूर कोंड्ये गावचे रहिवासी होते. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai goa highway accident car travels collision 4 dead several injured near rajapur
First published on: 11-09-2018 at 12:59 IST