कोणी कितीही टीका केली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश अभूतपूर्व दिशेने निघाला असल्याचे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नागपूरमध्ये वृत्तवाहिन्यांशी बोलताना व्यक्त केले.
सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो, ते अनुभवले आहे – शिवसेनेचा मोदींना टोला
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखामधून शुक्रवारी मोदी यांना टोमणे मारण्यात आले आहेत. प्रधानसेवकाचा पुढे सम्राट कसा होतो, ते जनतेने अनेकदा अनुभवले आहे, असा टोला लगावण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, मोदी देशातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्यामुळे देशात रोजगार निर्मितीला सुरुवात झाली आहे. त्यांच्यामुळेच देश अभूतपूर्व दिशेने निघाला आहे. कोणी कितीही टीका कलेी तरी काही फरक पडणार नाही, असेही फडवणीस म्हणाले.