बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. येथील ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यात वाद झाला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या आहेत. याबाबतचा दावा अप्पा जाधव यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत केला आहे. यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. पद विकायला काढल्यवरून सतत आरोप होत असतील तर ते गंभीर आहेत, असं नितेश राणे म्हणाले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

सुषमा ताई आमच्या कितीही देवी देवतांवर बोलल्या, आमच्यावर कितीही आरोप केले तरी त्यांना झालेल्या मारहाणीचं आम्ही समर्थन करत नाही. पण त्यांच्यावर झालेले आरोप आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जिल्हाप्रमुख पद विकायला काढलं होतं. ऑफिसच्या सोफा आणि एसीसाठी पैसे मागत होत्या. हे आरोप महाराष्ट्राने विचार करण्यासारखे आहेत, असं नितेश राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हाही त्यांनी हाच आरोप केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनीही तेच सांगितलं की संघटनेतील पदे विकली जात आहेत. तिकिटे विकली जातात. आताही तोच आरोप होतोय. वारंवार तोच आरोप होत असेल तर त्या आरोपांमध्ये तथ्य आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

महाप्रबोधन यात्रेत मला त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षाच नाही. कारण जसा पक्षप्रमुख तसे त्याचे कार्यकर्ते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यात हेच केलं. काय वेगळं केलं?एक रुपयाचेही इन्कम नसताना ते आलिशान आयुष्य कसं जगतात? एसी कोणत्या कंपनीचे लागले. व्हिडिओकॉन कंपनीचे मालक कोणाचे खासदार होते? कपडे धुवायला लीला मध्ये जातात. तिथे त्यांची भारतीय कामगार सेना आहे. यांच्या गाड्या पटेल नावाच्या व्यक्तीकडे जातात. परदेश दौऱ्यात एक रुपयाही उद्धवजिंच्या खिशातून जात नाहीत. सुष्माजी अजून वेगळं काय करणार, संजय राऊत अजून वेगळं काय करणार? महाराष्ट्राला दरोडेखोर म्हणून लुटतात. मग दुसऱ्यांवर काय आरोप करतात?, असंही नितेश राणे म्हणाले.