गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातल्या जनतेला आनंदाची बातमी आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुदर्शीपर्यंत राज्यातील भारनियमन रद्द करण्यात आले आहे. राज्याचे उर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी याबद्दलची माहिती दिली. आज मध्यरात्रीपासून भारनियमन रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच गणेशोत्सवात कोकणात जाणाऱयांना राज्य सरकारने अनोखी गणपती भेट दिली आहे. मुबंई-पुणे-कोल्हापुरमार्गे कोकण प्रवास टोलमुक्त करण्यात आला आहे. राज्याच्या बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला असून आता कोकणात जाणाऱया सर्व गणेशभक्तांना प्रवासासाठी टोल भरावा लागणार नाही. कोकणात जाण्यासाठी कोल्हापूरमार्ग सोपा पडतो, परंतु या महामार्गावर टोल अव्वाच्या सव्वा आकारला जातो. त्यामुळे भक्तांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी टोल मुक्त प्रवास उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2013 रोजी प्रकाशित
बाप्पा पावला: राज्यातील भारनियमन रद्द; कोकणप्रवास टोल फ्री
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातल्या जनतेला आनंदाची बातमी आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुदर्शीपर्यंत राज्यातील भारनियमन रद्द करण्यात आले आहे.

First published on: 08-09-2013 at 02:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No load shedding during ganesh chaturthi festival and no toll