रत्नागिरी : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळून झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचा चालक फरार आहे. याबाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री कोल्हापूरहून जयगडकडे चाललेल्या ट्रकमध्ये (एमएच ११- डी डी ०९६७)  रत्नागिरीकडे जाणारे काही प्रवासी बसले होते. ट्रक आंबा घाटात आला असता एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक घाटातील डाव्या बाजूच्या डोंगरकडय़ावर जोरात आदळला. ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या महिला सोनाबाई सखाराम लावनदे (वय ५८ वर्षे) या अपघातामध्ये  ठार झाल्या, तर ज्योतिबा बाबुराव लवनदे, (वय ५२) गंभीर जखमी झाले आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा जिल्ह्यातील वासोळे येथील एकाच कुटुंबातील आई, वडील, बहीण, मावस बहीण असे नातेवाईक या ट्रकमध्ये बसले होते. त्यापैकी रामकृष्ण सखाराम लवनदे, सोनाक्का बाबुराव लवनदे,  स्वाती प्रदीप पिसाळ, आरती योगेश झरंडे यांना किरकोळ मार लागला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघातानंतर  ट्रक चालक फरारी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One killed truck crashes hill amba ghat highway accident ysh
First published on: 01-10-2022 at 00:02 IST