येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर दोघेही मरून जातील असे वनमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आघाडीला पािठबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना जागावाटपात स्थान देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले की, लोकसभा निवडणुकीवेळी सर्वच ठिकाणी मोदी लाट होती, आता ती स्थिती राहिलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.