१६ एप्रिल रोजी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातून जवळपास १० लाख श्री सेवक उपस्थित होते. या श्री सेवकांना सुमारे सात-आठ तास उन्हात बसवून ठेवल्याने १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आमने-सामने आले.

या कार्यक्रमाचे आयोजक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधकांनी केली. याप्रकरणी आता शैला कंठे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून खारघर प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कंठे यांनी आपल्या याचिकेत केली आहे. याबाबतचं वृत्त ‘बार अँड बेंच’ने दिलं आहे.

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!
Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा

“खारघर येथील कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानगरपालिका आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त यांना खारघर येथील वाढत्या तापमानाची कल्पना होती. तरीही त्यांनी सरकारी तिजोरीतील १४ कोटी रुपये खर्च करून उपस्थित नागरिकांसाठी अयोग्य व्यवस्था केली. श्री सेवकांना सात ते आठ तास उन्हात बसवून ठेवलं. त्यामुळे संबंधित १४ जण उष्माघाताचे बळी ठरले,” असं शैला कंठे यांनी याचिकेत म्हटलं आहे.

निष्काळजीपणा आणि अयोग्य व्यवस्थेमुळे ही दुःखद घटना घडल्याचा आरोप कंठे यांनी केला. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली. हा कार्यक्रम आयोजन करून राज्य सरकारने लोकांच्या पैशांचा अपव्यव केला, असंही त्यांनी याचिकेत म्हटलं. त्यांनी वकील नितीन सातपुते यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे.