लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी हजेरी लावल्याने महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. या स्नेहमेळाव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने गद्दारी केल्याचे स्पष्ट होत असून पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी गुरूवारी केली.

Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
jayant patil on bjp power
मते ३२-३३ टक्क्यापर्यंत घसरली तर भाजप सत्तेतून बाजूला – जयंत पाटील
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Gajanan Kirtikar Eknath Shinde (1)
“त्यांनी शिंदेंना सलाम ठोकणं मला पटलं नाही”, पत्नीच्या वक्तव्यावर गजानन कीर्तिकर म्हणाले, “माझ्यावर…”
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी आयोजित केला होता. या मेळाव्यास आमदार डॉ. कदम, आणि अपक्ष उमेदवार पाटील यांनी हजेरी लावत कार्यकर्त्यांशी हितगूज केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते संघटित राहावेत यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मेळाव्याचे अधिकृत निमंत्रण देउनही जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील मदन पाटील युवा मंचने पाठ फिरवली होती.

आणखी वाचा-मते ३२-३३ टक्क्यापर्यंत घसरली तर भाजप सत्तेतून बाजूला – जयंत पाटील

यावेळी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. याचवेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही हजेरी लावत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच काँग्रेसचे नेते आमदार डॉ. कदम यांनीही या ठिकाणी हजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान हा मेळावा म्हणजे महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला विधानसभेची पायरीही चढू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी दिला आहे.