नाशिक व अहमदनगरमधील धरणांच्या जलसाठय़ाचा र्सवकष आढावा घेऊन जायकवाडीपर्यंत किती पाणी देता येऊ शकेल, याचा अहवाल पुढील चोवीस तासात राज्य शासनास सादर केला जाणार आहे. तसेच औरंगाबादला पाणी देताना नाशिक व नगर जिल्ह्यांसाठी आरक्षित असणारे पाणी दिले जाणार नसल्याचे विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांनी स्पष्ट केले. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दोन्ही जिल्ह्यांतील धरणांमध्ये जे पाणी आधीच आरक्षित आहे, त्यातील पाणी जायकवाडीला दिले जाणार नाही. यामुळे नागरिकांनी आपल्यावर जलसंकट कोसळणार अशी भीती बाळगू नये, असा दिलासा जाधव यांनी दिला.