नदीजोड प्रकल्प ही भारत तोडण्याची योजना असून हा प्रकल्प कधीही यशस्वी होणार नसल्याची टीका जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केली. राज्यांमधील पाणी वाटपाचे वाद न्यायालयास अद्याप सोडविता आले नसताना नदीजोड प्रकल्पांमुळे देशात मोठे वाद निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात गत दोन वर्षांत ठेकेदारांचा शिरकाव झाल्यामुळे पहिल्या वर्षीच्या तुलनेत त्या योजनेची यशस्वीता घटल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील शहिद स्मृती समितीतर्फे आयोजित जल परिषदेत राजेंद्र सिंह बोलत होते. देशातील मोठय़ा नद्यांच्या प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त करत आता युवकांनी नदी संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. जल संवर्धन आणि जलसाक्षरता या विषयी माहिती देत पाणीचक्र आणि पीकचक्र यांची सांगड घालुन पाण्याचा अधिक उपयोग करुन त्याच्या जलपुर्नभरणाची गरज अधोरेखीत केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: River link project is a plan to break the country say rajendra singh
First published on: 10-09-2017 at 02:50 IST