चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सरकारच्यावतीने जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः विविध पक्षांच्या नेत्यांना फोन करुन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. आम्ही चिंचवड – कसबा पोटनिवडणुकीत सर्व्हे केला असून दोन्ही मतदारसंघातील लोकांना निवडणूक हवी आहे. मतदारांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. शिक्षक, पदवीधरांनी जो निर्णय दिला, तसाच चिंचवड-कसबामध्येही लागेल. राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणे पत्र लिहिले असले तरी निवडणुका होतील”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

हे वाचा >> राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की…”

Congress has also prepared a list of spokespersons to face the BJP
भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रवक्त्यांची फौज
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
Amol Kirtikar challenge to Ravindra Waikar MP
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तिकरांचे आव्हान
charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
leaders photo missing from rohit patil birthday hoarding
आमदारपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिनी शुभेच्छा जाहिरात फलकावरुन वरिष्ठ नेत्यांची फोटो गायब
Pankaja Munde maharashtra legislative councile
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी!
bjp leaders start fielding to get legislative council elections ticket
विधान परिषदेसाठी भाजप नेत्यांची मोर्चेबांधणी; पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील प्रयत्नशील

फडणवीस कटूता कमी करणार होते, त्याचे काय झाले?

चिंचवड-कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरकारकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दाखल दिला जात आहे. याचाही समाचार राऊत यांनी घेतला. ते म्हणाले, “महाराष्ट्रात सर्वात आधी घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कुणी केली. राजकारण गढूळ कुणी केले? सुडाचे राजकारण कुणी सुरु केले? यावरही चिंतन व्हायला हवे. देवेंद्र फडणवीस मागे म्हणाले होते की, राजकारणातील कटूता कमी करण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण त्यांचे एकही पाऊल याबाबत पडलेले दिसत नाही. याबाबत राज्यातील जनतेला संभ्रम आहे. कसबा-चिंचवडसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढविणार होती, त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना चिंचवडच्या जागेबाबत आग्रही आहे. त्याबाबत मविआ लवकरच निर्णय घेईल.”

शिक्षक-पदवीधरप्रमाणे पोटनिवडणुकीचा निकाल लागेल

राऊत पुढे म्हणाले की, “दोन्ही मतदारसंघातील वातावरण सरकारसाठी अनुकूल नाही. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत जनतेने त्यांच्या मनात काय आहे? हे दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागणार. दोन्ही मतदारसंघात वेगळा निर्णय लागणार, असे जनमाणस दिसत आहे. तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्हाला कुणीही संपर्क केलेला नाही. संपर्क होण्याची शक्यता नाही. अंधेरी पोटनिवडणूक अपवाद असला तरी तिथेही निवडणूक झालीच होती, ही बाब लक्षात घ्यायला हवा. नांदेड आणि पंढरपूर पोटनिवडणुकीत काय झालं? हे सर्वांना माहीतच आहे.”