मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेविरोधात छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिकठिकाणी त्यांनी ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन केलं आहे. सरकारविरोधात घेतलेल्या या भूमिकेविरोधात त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर धरला होता. परंतु, आपण नोव्हेंबर महिन्यातच राजीनामा दिल्याचं छगन भुजबळांनी काल (३ जानेवारी) ओबीसी एल्गार सभेत जाहीर केलं. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

“छगन भुजबळांनी राजीनामा दिला आहे, मंत्रिमंडळात काम करू इच्छिता, ओबीसींसाठी काम करू इच्छिता आणि तुमचा राजीनामा स्वीकारला जात नसेल तर ही मिलीभगत आहे. लोक म्हणत आहेत की छगन भुजबळांच्या तोंडून देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. मग त्यांचा राजीनामा कसा स्वीकारला जाईल? कॅबिनेटमध्ये जेव्हा सरकार किंवा मुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली जाते तेव्हा संबंधित मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसतो”, असं संजय राऊत म्हणाले.

Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
Devendra Bhuyar and Ajit pawar
Ajit Pawar : मुलींबाबत देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…
Supriya Sule
Supriya Sule : “दीड ते दोन महिन्यांत आपल्याच विचारांचं सरकार…”, सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान
Controversy over ministership in Shiv Sena
शिवसेनेतील मंत्रिपदाची रस्सीखेच चव्हाट्यावर
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

हेही वाचा >> छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी त्यांचा…”

“छगन भुजबळ, जरांगे पाटील, धनगर समाजाच्या नेत्यांनी सरकारबरोबर बसून निर्णय घेतला पाहिजे. कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही मिळू नये. छगन भुजबळांनीही तीच भूमिका मांडली आहे. पण त्यासाठी महाराष्ट्रात इतक्या टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही. महाराष्ट्र जातीयवादाच्या खाईत ढकलला जातोय, हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चांगलं नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.

“भुजबळ म्हणतात की राजीनामा दिला आहे, पण राजीनामा स्वीकारला नाही. त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आहे की देवेंद्र फडणवीसांना आहे? हे महाराष्ट्रातलं राजकारण लोकांना कळतंय”, अशीही टीका त्यांनी केली.

पद्म पुरस्कारांत संघातील अधिक लोक

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आडवाणी यांच्याबरोबरीने बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही आम्ही भारतरत्न देण्याची मागणी केली होती. पण राजकीय सोय पाहण्याकरता सरकार अशा प्रकारची खिरापत वाटत आहे. यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमध्ये संघ परिवारातील सर्वाधिक लोक आहेत. लालकृष्ण आडवाणींचं देशातील राजकारणात मोठं योगदान आहे. राम मंदिरासाठी त्यांनी रथयात्रा काढली नसती तर आजचा भाजपा तुम्हाला दिसला नसता. दोन खासदारावरून भाजपा ३०० पार झाला तो आडवाणींमुळे. आडवाणींनी सातत्याने वाजपेयींची पाठराखण केली. अब की बार अटलबिहारी अशी घोषणा त्यांनी दिली. ते पंतप्रधान होण्याची त्यांची क्षमता असतानाही त्यांनी अशी घोषणा केली. पंतप्रधान होण्याची त्यांची क्षमता असतानाही त्यांना दूर सारलं गेलं. त्यांना इतकं गृहित टाकलं की आडवाणींना लोक विसरून गेले, अशीही टीका संजय राऊतांनी केली.