केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार जिल्हयातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ज्याच्या शेतात गेले होते, त्याच शेतकऱ्याने आज दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. शरद पवार यांनी तीन दिवसांसाठी विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्य़ांमधील गावांचा दौरा केला होता.
त्यांनी यवतमाळ जिल्ह्य़ातील किन्हाळा (ता. कळंब) येथील थावरू राठोड या शेतकऱ्याच्या शेताची पाहणी करताना थावरू राठोड यांच्यासोबत संवादही साधला होता.
या भेटीत पवार यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र कृषिमंत्र्याच्या आश्वासनावर तिळमात्रही विश्वास न दाखविता आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान थावरू राठोड यांनी त्याच शेतात विष प्राशन करून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. अलीकडे पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे शेतातील वाळत असलेल्या सोयाबीनला कोंबे फुटली आहे. त्यामुळे हातात आलेले पीक पूर्णत: वाया जाण्याच्या भीतीने राठोड यांनी जीवनयात्राच संपविली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2013 रोजी प्रकाशित
पवारांनी भेट दिलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार जिल्हयातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ज्याच्या शेतात गेले होते

First published on: 23-09-2013 at 01:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar visited farmer commits suicide in yavatmal