तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत काही दिवसांपूर्वी बाहेर आले आहेत. त्यातच आता राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स बजावलं आहे. बेळगाव न्यायालयात १ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश राऊत यांना देण्यात आले आहे. यानंतर संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

“मला बेळगावला बोलावणं हा कट आहे. त्यांना माझ्यावर हल्ला करायचा आहे. मला अटकही करण्याचा डाव आहे. पण, महाराष्ट्र घाबरणार आणि झुकणार नाही. मीही या सगळ्याला घाबरणार नाही. मी जाणार आणि आपली बाजू मांडणार. मात्र, बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला आणि अटकेचा कट रचला जात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “संजय राऊत अथवा शिल्लक सेनेचे नेते सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बेळगावात एक सुनावणी प्रकरणी त्यांना बोलावलं आहे. पण, माझ्यावर हल्ला होणार आहे, अशी सहानुभूती करण्याचा एकमेव उद्योग या लोकांकडे बाकी आहे. कर्नाटक सीमाप्रश्नासाठी कित्येक लोकांनी मार खाल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाळीस दिवस कर्नाटकातील तुरुंगात होते. मग, संजय राऊत का घाबरत आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार समर्थ आहे.”

कर्नाटक सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत नाहीत? असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावर नरेश मस्के म्हणाले, “संजय राऊत रोज सकाळी आपल्या गिरणीचा भोंगा वाजवत राज्य सरकारवर टीका करतात. याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोकळे आहेत का? संजय राऊत हे त्यांना नेमून दिलेले काम करत आहेत,” असा टोला नरेश मस्के यांनी लगावला.