राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून चुकीची कामे करु नये. दिवस बदलतात, सगळे दिवस सारखे नसतात. त्यामुळे येत्या काळात आम्ही कधी सत्तेत येऊ हे कोणाला कळणार देखील नाही, अशा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला होता. त्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांना टोमणा मारला आहे.

“सरकारी अधिकाऱ्यांवर पवार कुटुंबाचे दवाबतंत्र पहिल्यापासून आहे. यामध्ये काय नवीन नाही. पण, कोणताही अधिकारी या दबावाला बळी पडणार नाही. अजित पवारांना वाटत आपण पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन करू. मात्र, अजित पवारांनी पंधरा वर्षे निवांत रहायचं आहे,” असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे.

jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
Sharad Pawar Answer to Ajit Pawar
शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर, “घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, कारण..”
Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

हेही वाचा – “गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी छोटीशी भेट”; जम्मू कारागृह महासंचालकांच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेचा इशारा

“उद्धव ठाकरे फक्त मार्गदर्शन…”

दसरा मेळाव्यासाठी ‘मातोश्री’च्या बाहेर राष्ट्रवादीने बॅनरबाजी केली आहे. त्यावरून विचारले असता शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं की, “शिवतीर्थावर राष्ट्रवादीचा मेळावा आहे. उद्धव ठाकरे फक्त मार्गदर्शन करणार आहे. शिवाजी पार्कवर जमलेली गर्दी अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी गोळा केलेली असेल. खरे शिवसैनिक बीकेसी मैदानावर असतील,” अशी खोचक टिप्पणी शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.