शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत बंड करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. ४८ तासांच्या आता या आमदरांना आपले भूमिका मांडण्यास सांगितले आहे. जर आमदारांनी या वेळेत आपली भूमिका मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

हेही वाचा- शिवसेना पुन्हा उभी राहील!; उद्धव ठाकरे यांचा विश्वास, भाजपवर कारस्थानाचा आरोप

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

बंडखोर आमदारांना सोमवारपर्यंत वेळ

शिवसेनेकडून १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवावे यासाठी विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी करण्यात आली होती. महाधिवक्ता विधान भवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि इतर नेत्यांसोबत याबाबत बैठक झाली. साधारण चार तास चाललेल्या बैठकीनंतर बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. आपली भूमिका मांडण्यासाठी बंडखोर आमदरांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र, या वेळत जर त्यांनी आपली भूमिका मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल असे सावंत म्हणाले.

हेही वाचा -“हिंदुत्वाबद्दल जो बोलतो तो त्यांचा शत्रू”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

शिवसेनेचा भगवा सोडून कमळाबाईची साथ
तसेच बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं की नाही हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. या आमदारांचा वेगळा गट होऊ शकत नाही. त्यांना भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल. मात्र, आम्ही कट्टर शिवसैनिक असल्याची डायलॉगबाजी हे बंडखोर आमदार करत होते. पण भाजापामध्ये प्रवेश केल्यानंतर ती डायलॉगबाजी बंद होईल, असा टोला सावंत यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी त्यागेच्या भावनेने वर्षा निवासस्थान सोडले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिवसेना सोडून दूर लपून बसलेल्या त्या आमदारांसाठी स्वत:चे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे आता त्यांना शिवसेनेचा भगवा सोडून कमळाबाईची साथ पकडावी लागेल, असा टोलाही अरविंद सावंत यांनी लगावला.