प्रदीप नणंदकर लातूर :

गेल्या आठवडयात सोयाबीनचा भाव ५३०० प्रतिक्विंटल होता तो घसरून आता चार हजार ९०० पर्यंत खाली आला आहे. सोयाबीनच्या भावात गेल्या दोन वर्षांपासून तेजी नाही. सतत भावात घसरण होते आहे. सोयाबीनचा हमीभाव चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल आहे. या वर्षी खरीप हंगामात पावसाने ताण दिल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षाही अधिक घट झाली आहे. भांडवली खर्च वाढता व उत्पादन कमी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीनच्या भावात गेल्या आठवडयात चारशे रुपये वाढ झाल्यामुळे शेतकरी भाव वाढेल अशी आशा बाळगून होता; मात्र आता आठवडय़ाभरात चारशे रुपयांनी भाव घसरले आहेत.

heavy rain, thane district, Barvi Dam, storage, 60 percentage
बारवी धरण ६० टक्के भरले, २४ तासांत ६ टक्क्यांची वाढ
Mohadi taluka, bridge, washed away,
बापरे… चक्क पूल वाहून गेला! १८ लाखांचा खर्च अन् १८ आठवड्यांच्या आतच…
Anganwadi Workers, Anganwadi Workers Agitation, Unfulfilled Promises , Anganwadi Workers Agitation, latest news, loskatta news,
अंगणवाडी सेविकांचे असहकार आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
st mahamandal employees salary
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला, २३० कोटी रुपये निधी वितरित
What is Next of kin rule
Next Of Kin नियम काय आहे? लष्करातील या नियमात सुधारणा करण्यासाठी का होतेय मागणी?
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
32 thousand crores fundraising through ipo in six months boom in ipo
विश्लेषण : सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची निधी उभारणी… आयपीओ बाजारातील तेजी कुठवर?
price, vegetables, leafy vegetables,
गृहिणींना दिलासा… पालेभाज्यांच्या दरात किती घट झाली?

हेही वाचा >>> सांगली : हो-नाही करत माजी महापौर सुर्यवंशी अजित पवारांच्या गटात

सोयाबीनच्या भावात घट होण्याची जी कारणे व्यक्त केली जात आहेत त्यात दिवाळीनंतर बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. याशिवाय तांदळापासून जी पेंड तयार केली जाते त्याच्या निर्यातीवरील बंदीला एक वर्षांची केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. सोयाबीनचे भाव वाढले, तर सोयाबीनच्या पेंडीलाही निर्यात बंदी येऊ शकते या भीतीने सोयाबीनचे भाव वाढू दिले जात नसल्याचा अंदाज आहे. ब्राझीलमध्ये हवामान बदलावरून बाजारपेठेत सट्टेबाजी केली जाते. कारण ब्राझीलमधील सोयाबीनचे उत्पादन हे भारताच्या १६ पट आहे. पाऊस पडला की उत्पन्न अधिक होईल व दोन दिवस ऊन पडले तर दुष्काळ पडेल अशी चर्चा करत भावातील चढ-उतार होते आहे. त्याचाही फटका देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला बसतो आहे. खाद्यतेलावर आयात शुल्क नसल्याने परदेशातून मोठय़ा प्रमाणावर खाद्यतेल मागवले जाते. सध्या आफ्रिकेतील खाद्यतेल मोठय़ा प्रमाणावर भारताच्या बाजारपेठेत दाखल होत असल्यामुळे त्याचाही परिणाम देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव न वाढण्यावर होतो. त्यातूनच सोयाबीनचे भाव घसरत आहेत.