राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी महाविद्यालयांच्या प्राध्यपकांच्या वेतनाबाबत केलेल्या विधानावरून टीका केली आहे. शिवाय ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात. असंही सुप्रिया सुळे यांनी सांगलीत एका कार्यक्रमातील भाषणात म्हटलं. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती.

सुप्रिया सुळे म्हणाल्या “एक मंत्री जेंव्हा बोलतो तेंव्हा त्याला हलक्यात घ्यायचे नाही. अशी गंमतजमंत करायचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही भाषण करताना विचार करूनच बोला. इतका मोठा मंत्री जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांनी त्याबाबत निधी तयार ठेवला असेल. निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची?, शक्य अशक्य या गोष्टी मंत्र्यांनी बघायच्या आहेत, कारण वक्तव्य त्यांनी केले आहे.”

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!

हेही वाचा : राज्यात मध्यवधी निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंचं पत्रकारपरिषदेत विधान, म्हणाल्या…

याचबरोबर “जर उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणत असेल की सर्व खासगी कॉलेजच्या शिक्षकांचे पगार आम्ही करणार तर तुम्ही निधी तयार ठेवला आहे का? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का ? उठ सुठ महाराष्ट्रातील मंत्री बेजजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत आहे.” असंही यावेळी सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवलं.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते? –

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाबाबत विधान केलं होतं. “शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकांची कमतरता आहे. पण तरीही धकवले जात आहे. प्राध्यापकांची कमतरता कमी व्हावी म्हणून २ हजार ७२ प्राध्यापकांची भरती करत आहोत. महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क आकारून त्यातून प्राध्यापकांचे पगार होत असेल. तर तुम्ही फी कमी करा, तुमच्या प्राध्यापकांचे पगार आम्ही करतो.”